लग्न म्हणजे नेमकं काय विनोदि कवीता
‘लग्न’ हे सुंदर जंगल आहे.
जिथे ‘बहादुर वाघांची’ शिकार,
मोहक हरिणी करतात…
लग्न म्हणजे – ‘अहो ऐकलंत का ?’ पासुन ते
‘बहिरे झालात की काय ?’ पर्यंतचा प्रवास.
लग्न म्हणजेच –
‘तुझ्यासारखे या जगात
कुणीच नाही’ पासून ते,
‘तुझ्या सारखे छप्पन बघितलेत’
पर्यंतचा प्रवास…
लग्न म्हणजे –
‘तुम्ही राहू द्या’ पासुन ते
‘तुम्ही तर राहुच द्या’
पर्यंतचा प्रवास …
लग्न म्हणजे –
‘कुठे होती ग माझी राणी’ पासून ते
‘कुठे मेली होतीस’
पर्यंतचा प्रवास…
लग्न म्हणजेच-
‘तुमचे नशीब मी भेटले तुम्हाला” पासुन ते
‘मेलं माझंच नशीब फुटकं,
तुम्ही मला भेटलात”
पर्यंतचा प्रवास …
थोडक्यात काय तर –
वैवाहिक जीवन हे
कश्मीर सारखे आहे,
सुंदर तर आहेच,
परंतु दहशत पण आहे …
ही कविता लिहून कवी फरार आहे….