Table of Contents
लग्नंच वाढत वय आणि लग्नाळू विवाहाचा राष्ट्रीय प्रश्न लग्नंच वाढत वय अपेक्षांचे ओझे आणि लग्नाळू
लग्न न झालेले
समाजात काही काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण तरुणी मोठ्या संख्येने दिसतील, वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीच न झाल्याने वृद्धाश्रम मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य कंठण्याची वेळ येणार यात शंका वाटत नाही.विवाहाचा राष्ट्रीय प्रश्न लग्नंच वाढत वय अपेक्षांचे ओझे आणि लग्नाळू
अपेक्षांचे ओझे
अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी ही पिढी स्वतः बरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंता ना जन्म देत आहे, कारण मुला मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रम जबाबदारी संपते, पुढील पिढी कडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्तीच्या आयुष्याचे नियोजन करू शकतात, आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे.
भौतिक सुख पेक्षा मानसिक आधार आवश्यक
फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही, कौटुंबिक आयुष्यात बऱ्या वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पती पत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात, जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे.
शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीन जुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे याचा दुराग्रह, हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे, तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे तेही आपणच आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे.
विवाह साठी पार्श्वभूमी तयार करा
खरं तर बायोडेटा बघून किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यावर कशी मात करून विवाह साठी पार्श्वभूमी तयार करता येईल याचा विवाह इच्छुक तरुण तरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा, ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे.
आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारच आहेत, पण सामाजिक संतुलन बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा ह्या बाबी मारक ठरत आहेत.
अपेक्षांचे दुराग्रह
स्त्री – पुरुषाच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यातूनच होत असते, आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत, आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आहे.
राष्ट्रीय प्रश्न
लोक संख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपान सारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे, घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे
शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे एव्हढे करून पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले Efforts आणि वाढलेल्या वयाचे काय?
कृपया संवादाचे पुल बांधून लौकरात लौकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल यासाठी काय पावले उचलावी लागतील याचा मुळा पासून विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.
Maratha Matrimonial Khandeshi Maratha Matrimony
बाबा मला शेतकरी नवराच हवा आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास विवाह सोहळ्यातील अनाठायी खर्च अनिष्ट प्रथा रद्द लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी What is marriage? लग्न लग्न म्हणने काय असतं ? फरार झालेल्या नवरदेवाला पोलिसांनी परत आणुन लग्न लावले लग्नात खुर्चीवरून भांडण झाल्यामुळे लग्न रद्द
1 thought on “विवाहाचा राष्ट्रीय प्रश्न लग्नंच वाढत वय अपेक्षांचे ओझे आणि लग्नाळू”